गौतम अदानी यांची संपत्ती इतक्या डॉलरवर घसरली
– कंपन्यांचे मार्केट कॅप ४९ टक्क्यांपर्यंत
प्रतिनिधी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अदानी समूह चर्चेत आला आहे. हेंडनबर्ग रिसर्चने जाहीर केलेल्या अहवालानंतर अदानी समूहातील कंपन्यांचे मार्केट कॅप ४९ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. स्वत: गौतम अदानी यांची संपत्ती ६० अब्ज डॉलरवर आली आहे. अदानी समूहाबद्दल रोज नव्या चर्चा सुरू असताना आता गौतम अदानी यांचा मुलगा करण चर्चेत आला आहे.
करण अदानीला एक मोठी जबाबदारी मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या आर्थिक सल्लागार परिषदेवर करणची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीला आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेने आक्षेप घेतला आहे.
राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्याया परिषदेची पहिली बैठक १३ फेब्रुवारी रोजी मुंबईत होणार आहे. करण अदानी हे अदानी पोर्ट्सचे सीईओ आहेत. करण यांच्या नियुक्तीला विरोध करताना शिवसेनेचे नेते अंबादास दानवे म्हणाले, ” अदानी समूहामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान होत आहे. अशा वेळी करण अदानी यांची राज्य आर्थिक परिषदेवर कशी काय नियुक्ती होऊ शकते? एका आंतरराष्ट्रीय संस्थेने त्यांच्या व्यवसायातील अनियमितता उघड केली आहे. आता आरबीआयने बँकांना अदानी समूहाला दिलेल्या कर्जाबद्दल माहिती देण्यास सांगितले आहे.
दानवे यांनी यासंदर्भात ट्विट देखील केले आहे की, “आशर आशर, अदानींसाठी सरकार चालवण्यापेक्षा हे राज्य सरकार त्यांच्याच ताब्यात देऊन टाका! कशाला ते तरी चालवता. आर्थिक परिषदेच्या सदस्य यादीत AdaniOnlineचे करण अदानी यांचा समावेश करून हे सरकार कोणासाठी काम करते, हे स्पष्ट झाले. हे महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाहीत.
अजय आशर आणि करण अदानी यांच्यासाठी सरकार चालवण्याऐवजी राज्य फक्त त्यांच्या ताब्यात दिले पाहिजे. करण अदानींचा ईएसीमध्ये समावेश केल्याने, हे सरकार कोणासाठी काम करते हे स्पष्ट झाल्याचे दानवे म्हणाले. या परिषदेची स्थापना ३० डिसेंबर रोजी झाली होती. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत. सदस्यांमध्ये मुकेश अंबानींचा मुलगा अनंत आणि करण अदानी यांचा समावेश आहे. परिषदेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकारी आणि जवळच्यां संधी दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.


